



हिंगणघाट (वर्धा ) ः आशा सेविकांच्या प्रश्नावर सरकार लक्ष देत नसल्याचे लक्षात येताच आशा सेविकांनी मनसेकडे धाव घेतली. जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांना निवेदन देऊन विविध विषयांवर चर्चा केली. तर अतुल वांदिले यांनी सरकारने आशा सेविकांच्या समस्या सोडविल्या नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
आशा स्वयं सेविका व गट प्रवर्तकांच्या अद्यापही सोडवणूक न झाल्याने आशा स्वयंसेविकांनी मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या कडे घेतली मदतीची धाव व निवेदन दिले. आशा स्वयं सेविका व गट प्रवर्तकांचा विविध मागण्यासाठी राज्यव्यापी संप सुरू असून आशा स्वयंसेविकांच्या कामबंद आंदोलन जिल्ह्यात सुरू आहे. यामुळे आज आशा स्वयंसेविका यांनी मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात विविध प्रकारच्या १५ मागण्या आहेत शासनाने आशा व गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा द्यावा, मानधनात वाढ करावी, आरोग्य विभागाचा नोकर भरती त आशा स्वयंसेविकांना प्राधान्य द्यावे, त्यांचे कामाचे तास कमी करण्यात यावी, अशा अनेक मागण्या शासनाने मान्य करावा, यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांना निवेदन देण्यात आले.