Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरमुंबई

शेतकरी मिशन ‘सरकार आपल्या दारी’ ; किशोर तिवारी घेणार आढावा

नागपूर ः यवतमाळ जिल्ह्यात मागील 14 महिन्यापांसून कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनामध्ये महामारीला तोंड देण्यासाठी सगळी व्यवस्था लागली असल्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील ग्रामीण जनतेची नवीन पीक कर्ज वाटपाची, मागील वर्षाच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, पीककर्ज माफीच्या तक्रारी व प्रलंबित प्रकरण या विषयावर प्रचंड तक्रारी येत आहेत. त्यामुळे ‘सरकार आपल्या दारी’कार्यक्रम पुन्हा सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.

मागील 6 वर्षांपासून शेतकरी मिशनद्वारा ‘सरकार आपल्या दारी’ व ‘सरकार आपल्या गावात मुक्कामी’हे अफलातून कार्यक्रम सुरु करण्यात आले आहेत. सुरूवातीला या मोहिमेला ग्रामीण भागातील अधिकारी-कर्मचारी थोडीसी आनाकानी वा टाळाटाळ करीत असे, मात्र नंतर 1 वर्षाने ही मोहीम प्रशासन व जनतेचा संवाद कायम करणारी असून यामुळे ग्रामीण जनतेला त्यांच्या समस्या तत्काळ सुटत असल्यामुळे अधिकारी-कर्मचारी पूर्ण जोमाने शामिल होत होते. मात्र, मार्च 2020 नंतर कोरोनाचा प्रकोप व लॉकडाउन निर्बंध यामुळे या अभिनव मोहिमेत खंड पडला होता. आता सरकारने निर्बंध शिथिल केल्यामुळे सूचनांचे पालन करून आता पुन्हा सरकार आपल्या दारी व सरकारचा आपल्या गावात मुक्कामी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या दौर्‍यात किशोर तिवारी यांच्यासोबत सर्व विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी असतील व जनतेच्या समस्या मांडण्यासाठी त्या भागातील लोकप्रतिनिधी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी व समस्यांचे तत्काळ निवारण व्हावे, यासाठी या मोहिमेचे सन्मयक व आदिवासी नेते अंकित नैताम करीत असल्यामुळे नागरिकांनी भेटीपूर्वी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे किशोर तिवारी यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

बेरोजगारांच्या हाताला काम दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घरडे यांचा संकल्प

divyanirdhar

सरपंच जयश्री इंगोले यांच्या खसाळ्यात उमलली ‘समृद्ध पंचायत’ची पहाट

divyanirdhar

कोणाला हवाय १८ वर्षांवरील दिव्यांगांसाठी कायदा…वाचा

divyanirdhar

स्थानिकमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंला पुन्हा हुलकावणी?, मोहभंग होण्याची शक्यता

divyanirdhar

प्रतिमा सुधारण्यासाठी अबब… 24 लाखांचे कंत्राट ः चंद्रपूर पालिकेचा प्रताप

divyanirdhar

कसे झाले साध्य; नागपूर जिल्ह्यात १३३ गावांत शंभर टक्के लसीकरण

divyanirdhar