Divya Nirdhar
Breaking News
नागपूरमहाराष्ट्रविदर्भ

प्रत्येकाने बुद्धाच्या तत्त्वज्ञाने पालन करणे आवश्यक : महाराष्ट्र विद्रोही चळवळीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव

नागपूरः माणसामाणसांतील जातीयता, भेदभाव, अंधश्रद्धा दूर करावयाची असेल तर प्रत्येकाने बुद्धाच्या तत्त्वज्ञाने पालन करणे आवश्यक आहे. यातून मानवाचे कल्याण आहे, असे मत महाराष्ट्र विद्रोही चळवळीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव यांनी व्यक्त केले. नागपूर येथील बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने राष्ट्रीय बुद्ध जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हे बोलत होते. ऑनलाइन पार पडलेल्या महोत्सवामध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान,अंदनाम निकोबार यासह अनेक राज्यातील विचारवंत सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबन चाहांदे होते. धनाजी गुरव म्हणाले की, जो उपदेश बुद्धाने आपल्याला केला तो आपल्या जीवन जगण्याचा भाग झाला तरच बुद्ध धम्माची गोड फळे आपणास सर्व क्षेत्रात चाखायला मिळतील. जातीयता, धर्मांधता, गरिबी,अंधश्रद्धा, द्वेष, अत्याचार, विषमता सध्या जगभर उच्छाद मांडत आहे. त्यावर बुद्ध हेच उत्तर आहे. तर अध्यक्षीय भाषण बबन चाहांदे म्हणाले की, बौद्ध पुरातत्त्व वारसा भारत, पाकिस्तान,अफगाणिस्तान या पूर्वीच्या जम्बूद्वीपमध्ये दररोज मिळतो आहे. त्याचे जतन करून पालीचे लोक भाषेत बुद्ध उपदेशाचा अनुवाद केला पाहिजे. लेह लडाखचे फुनसुक लडाखी यांनी बुद्ध हा चर्चेचा विषय नसून अनुसरण्याचा मार्ग असल्याचे सांगितले. तर तामिळनाडूचे अमारेसान म्हणाले की,आपली सर्वांप्रति मैत्री असली पाहिजे तेव्हा वैर नष्ट होईल आणि धम्म प्रसार होईल. कर्नाटक येथील तिबेटीयन ताशा डोलमा,अंदमान निकोबारचे विराबाबू,आंध्र प्रदेशचे डॉ.दोराबाबू यांची विचार व्यक्त केले. राजस्थानचे टीकमचंद लोहिया यांनी बुद्ध धम्म राज्य निर्मितीसाठी १० हजार चौ. फु. जमीन बुद्ध विहार बांधण्यासाठी दान करीत असल्याचे जाहीर केले. डॉ.पुष्पाताई थोरात यांचेही भाषण झाले. समितीचे मुख्य संयोजक अशोक सरस्वती यांनी प्रास्ताविक केले. प्रा.उमेश पठारे यांनी संचालन केले. हर्षवर्धन पठारे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. तेलंगणाचे राजेंद्र प्रसाद नरहरी यांनी आभार मानले.

संबंधित पोस्ट

आश्चर्य आहे ना! …. त्या आठ गावांनी कोरोनाला टांगले वेशीवर

divyanirdhar

बौद्ध अधिकाऱ्यांना टारगेट करण्याचा जातीय संघटनांचा कट;  बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या पदमुक्तीवरून राज्यात आक्रोश

divyanirdhar

मंत्री वडेट्टीवारांचा अजून एक गोंधळ निस्तरा : डॉ. बंग

divyanirdhar

सर्वच प्रकारची दुकाने दुपारी २ पर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा निर्णय

divyanirdhar

वकिली व्यवसाय नाही तर लढण्याचे शस्र; ॲड. सोनिया अमृत गजभिये ह्या वकिली व्यवसायात शिखरावर

divyanirdhar

1600 कोटी खर्च येणार, 10 एकरात सेंटर; पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

divyanirdhar