Divya Nirdhar
Breaking News
modi
आंतरराष्ट्रीयठळक बातम्यानागपूरमुंबईराजकीयराष्ट्रीयविदर्भ

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा वापर करणार – पंतप्रधान

प्रतिनिधी/दिव्यनिर्धार

नवी दिल्ली : भारत जागतिक हवामान बदलासाठी तयार असून इथेनॉलचा वापर 21 व्या शतकातील भारताची प्राथमिकता असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादा दरम्यान केले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयातर्फे संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘उत्तम पर्यावरणासाठी जैव इंधनाला प्रोत्साहन’ ही कार्यक्रमाची थीम होती.
नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये भारताची रिन्यूएबल एनर्जीची क्षमता ही 250 पटींहून अधिक झाली असून सध्या वापरात असलेल्या रिन्यूएबल एनर्जीच्या क्षमतेबाबत भारत जगातील पहिल्या पाच देशांच्या यादीत आहे. गेल्या सहा वर्षाच्या काळात भारताच्या सौर उर्जेची क्षमता ही जवळपास 15 टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक हवामान बदलाच्या संकटाबद्दल भारत जागरुक असून त्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारत सक्रियतेने काम करत आहे.
ते पुढे म्हणाले कि, इथेनॉलच्या वापरावर भारत लक्ष केंद्रीत करत असून इथेनॉलवर लक्ष केंद्रीत केल्याने त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होणार आहे. 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचा संकल्प आपण केला आहे. त्यासाठी एक रोडमॅप जाहीर करण्यात आला आहे. देशभरात इथेनॉलच्या उत्पादनाशी आणि वितरणाशी संबंधित महत्वाकांक्षी पायलट प्रोजेक्टची सुरुवात पुण्यात करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वच पक्षांत बंडखोरीः भाजपचा निधान, कॉंग्रेसचा ज्योती राऊत यांना धक्का

divyanirdhar

प्रतिबंधित बियाणे खरेदीपासून शेतकऱ्यांनी राहावे सावध.. कोणी केले आवाहन…वाचा

divyanirdhar

तो आपला घात करेल’…पाच जणांची हत्या करून केली आत्महत्या

divyanirdhar

सहा महिन्यांपासून रेशनच्या धान्यासाठी वणवण…अधिकारी देतात हुलकावणी

divyanirdhar

तृणमूलच्या गुंडगिरीविरुद्ध लढा देण्याचा निर्धार, नोकरीवरून काढून टाकलेल्यांना अर्थसाह्य

divyanirdhar

बार्टीमुळे गवसला विकासाचा मार्ग ः महासंचालक धम्मज्योती गजभिये

divyanirdhar