Divya Nirdhar
Breaking News
kavle
ठळक बातम्यानागपूरमुंबई

डॉक्टर म्हणतात, रुग्णालयातील संपले औषध, आणा बाहेरून

नागपूर ः कोरोनामुळे शासकीय रुग्णालयात रुग्णांचा गर्दी होत आहे. त्याचा फटका आता रुग्णांनाच बसत आहे. रुग्णालयात औषध नसल्याचे सांगून बाहेरून औषधी घेऊन या सल्ला शासकीय रुग्णालयातील डॉक्टर देत आहे. यामुळे आता रुग्णांच्या खिशाला कात्री लागली आहे. तर रुग्ण मात्र,पर्याय नसल्याने काय करावे, अशा मनःस्थितीमध्ये आहेत. शासनाने औषधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी व कामगार नेते राजानंद कावळे यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था चांगलीच ढासळली आहे. कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेचे लक्तरे वेशीवर टांगली गेली. रुग्णावर उपचार करतानाही त्यांना यातना दिल्या जातात. राज्य आरोग्य यंत्रणा आहे किंवा नाही, असाच प्रश्न सध्या प्रत्येकांना पडत आहे. कोरोनानंतर परिस्थिती सावरीत आहे. मात्र कोरोना नंतर रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनानंतर विविध आजार बळकावले आहे. दातदुखीसह इतर आजाराचे रुग्ण शासकीय रुग्णालयात येतात. मात्र, डॉक्टर त्यांना बाहेरून औषधी आणा म्हणून सांगतात. यामुळे आधीच बेरोजगार असलेला ग्रामीण भागातील रुग्ण शासकीय रुग्णालयात २० रुपये देऊन येत असली तरी त्याला खासगी दुकानातून औषधी घेणे परवडणारे नाही. मात्र, रुग्णालयात औषधी नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे रुग्णांमध्ये प्रचंड रोष आहे. शासनाने शासकीय रुग्णालयाचा औषधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पुढे आली आहे. शासनाने औषधी उपलब्ध करून दिली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही कावळे यांनी दिली आहे.

खासगी रुग्णालयाला केले जाते रेफर
कोरोना झाल्यानंतर रुग्णांना विविध आजाराने घेरले आहे. ग्रामीण भागात यावर जनजागृती नसल्याने त्यांच्यासमोर शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय नसते. मात्र, तिथेही त्यांना खासगी रुग्णालयाचा प्रेमाने मार्ग दाखविला जातो. भीतीपोटी आणि डॉक्टरकडून मिळालेल्या आश्वासनामुळे रुग्ण खासगी दाखल होत असून सामान्य आजारासाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जात आहे. यात डॉक्टरांचे कमिशन ठरले असल्याची माहिती आहे.

संबंधित पोस्ट

शिक्षकांनी ६ हजारांत घर कसे चालवायचे…राजानंद कावळे यांचा प्रश्न

divyanirdhar

राष्ट्रवादीचा शहराचा नवा गडी तयार, शहराध्यक्षपदी दुनेश्वर पेठे यांची नियुक्ती

divyanirdhar

मागासजातीचे होणार बेंचमार्क सर्वेक्षण; बार्टीचा पुढाकार; ४०७ गावांची निवड

divyanirdhar

पैशाचा पडला पाऊस, हुबेहुब छापल्या शंभरच्या नोटा..

divyanirdhar

हिंगणा, कुहीसाठी भाजपने फुंकले रणशिंग; जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्त्वात उमेदवारांच्या मुलाखती

divyanirdhar

सरकार बाराबलुतेदारांना उपाशी मारणार काय?, डी.डी. सोनटक्के यांचा सरकारला सवाल

divyanirdhar